महाविकास आघाडी सरकारमध्येच हुतूतू - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

 रामशेठ ठाकूर यांचा आदर्श घेऊन आमदार प्रशांत ठाकूर कार्यरत - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
 

पनवेल : खेळाडूंना त्यांच्या उन्नतीसाठी राज्य सरकार कडून ताकद मिळणे अत्यंत गरजेचे आहे, परंतु महाविकास आघाडी सरकारमध्येच हुतूतू सुरु असल्याने जनतेच्या प्रश्नांकडे ठाकरे सरकारचे दुर्लक्ष होत आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी धरणा कॅम्प येथे केली.  

 महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने जय भवानी नवतरुण मंडळाच्या वतीने दिनांक २२ ते २४ एप्रिल पर्यंत 'आमदार प्रशांत ठाकूर चषक' भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा धरणा कॅम्प येथे आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे उदघाटन शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, उप महापौर सीता पाटील, महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला व बाल कल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती सभापती संजना कदम, प्रमिला पाटील, अरुणा भगत, वृषाली वाघमारे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी,  नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, एकनाथ गायकवाड, बबन मुकादम, अभिमन्यू पाटील, प्रविण पाटील, संतोष भोईर, राजेंद्र शर्मा, निलेश बाविस्कर, नगरसेविका चारुशीला घरत, अनिता पाटील, खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष कदम, युवा नेते समीर कदम, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, विपुल पटेल, सूर्यकांत ठाकूर, गीता चौधरी, राम वरदायिनी ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव शिंदे, मंडळाचे अध्यक्ष शेखर कदम, सचिव प्रशांत कदम, खजिनदार जितेंद्र कदम यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कबड्डी प्रेमी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या स्पर्धेच्या निमित्त अर्जुन पुरस्कार विजेते अर्जुन शिंदे, राजू भावसार आदी क्रीडापटूंचा विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 
 
        यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उदघाटनपर भाषण करताना म्हंटले कि, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असताना क्रीडा क्षेत्राला महत्व देण्याचे काम  रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. ते केवळ स्पर्धा आयोजित करून थांबले नाहीत तर वेगवेगळ्या क्षेत्रातील क्रीडापटूंच्या भविष्यासाठी मार्गदर्शन आणि मदत देऊन त्यांना घडविण्याचे काम केले आहे, आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आमदार प्रशांत ठाकूर काम करीत आहेत. एके काळी फक्त क्रिकेटलाच ग्लॅमर होते, पण आता क्रिकेट एवढेच किंबुहना क्रिकेटपेक्षा जास्त महत्व कबड्डीला आले आहे. क्रिकेटपटूच्या प्रशिक्षणासाठी मदत होते पण कबड्डी, कुस्तीला त्या तुलनेने मदत होत नाही. या खेळाडूंना राज्य सरकार म्हणून ताकद मिळत नाही. कबड्डीला प्रोत्साहन, मदत केली पाहिजे हा आग्रह मी कायम धरला आहे पण दुर्देव आहे कि हे सरकार दुर्लक्ष करतच राहिले आहे. एकही अधिवेशन असे झाले नाही कि त्यामध्ये मी खेळांच्या संवर्धनाविषयी बोललो नाही. कबड्डीला प्रोत्साहन दिले पाहिजे, खेळाडूंना मदत केली पाहिजे, नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण दिले पाहिजे पण ह्या महाविकास आघाडी सरकारमधेच हुतूतू सुरु आहे. कुरघोडी करण्याचेच काम महाविकास आघाडीमध्ये सुरु असून या राज्य सरकारला फक्त राजकारण करायला वेळ आहे, असा सणसणीत टोलाही दरेकर यांनी ठाकरे सरकारला लगावला. 
 
विरोधी पक्ष म्हणून चढाई करून ठाकरे सरकारला चारी मुंड्या चित्त करण्याचे काम आपण करत असतो.  सरकारला धारेवर धरत त्या ठिकाणी तरुणांचे, नागरिकांचे प्रश्न मांडत असतो  आणि त्यावेळी राज्य सरकाकडून माझी कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्यांच्या टीमला जमत नाही म्हणून पोलिसांची टीम मागे लावतात आणि त्यामध्येही मी सापडत नाही कारण पंच पण एवढे मजबूत आहेत कि खोट्या डावाला ते हाणून पाडतात, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. मातीतल्या खेळाडूंना जास्तीत जास्त मदत व्हायला पाहिजे यासाठी अधिक प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी आश्वासित केले. तसेच रामशेठ ठाकूर यांचा आदर्श घेऊन आमदार प्रशांत ठाकूर काम करत असल्याचा पुनरुच्चार करून आयोजक, खेळाडू यांना धन्यवाद दिले. 
 
      यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले कि, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगड आहे आणि या रायगड जिल्ह्याला कबड्डी या मैदानी खेळाची परंपरा लाभली आहे. येथील अनेक तालुके असे आहेत कि गावागावात तीन- चार संघ आहेत आणि अनेक दिग्गज खेळाडू यामध्ये आहेत. या खेळाडूंनी राज्यातच नव्हे राष्ट्रीय स्तरावर उतुंग कामगिरी केलेली आहे.  रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कै. बुवा साळवी यांच्या आशीर्वादाने त्या स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या. या स्पर्धा घेण्यासंदभात जेव्हा बैठका व्हायच्या त्यावेळी ते बोलताना कबड्डी हाच त्यांचा श्वास आहे हे दिसून यायचे. हा सर्व काळ आहे तो टीव्ही, प्रसार माध्यम पोहोचण्यापूर्वीचा आणि प्रो कबड्डी सुरु होण्याच्या आधीचा आहे. देशात कबड्डी होती पण घराघरात कबड्डीचा थरार पोहोचला तो त्याला मिळालेल्या ग्लॅमरमुळे. या स्पर्धचे आयोजन रायगड जिल्ह्यात करायला मिळत आहे ती आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. जय भवानी तरुण मित्र मंडळाच्या वतीने या गावातून अनेक खेळाडू महाराष्ट्राला दिले गेले आहेत. कोयना प्रकल्पगस्तांचे हे वंशज आहेत. कबड्डी खेळाविषयीचे प्रेम आणि आपली जी दैवत आहेत त्यांच्या विषयी असलेला आदर भाव पुढच्या माहिती करून देण्यासाठी हि सर्व मंडळी प्रयत्न करीत आहेत. 
 
        पनवेल नगरपालिकेची महागरपालिका झाली आणि हद्दीतील परिसराच्या विकासाचा आलेख उंचावत गेला. महानगरपालिका हद्दीतील प्रत्येक भागाच्या विकासासाठी महापालिका काम करीत आहे.  त्या अनुषंगाने विविध संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. कबड्डी क्षेत्रातही आपण मागे कुठे राहू नये यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. असे सांगतानाच आमदार प्रशांत ठाकूर यांनी खेळाडू, प्रेक्षक आणि आयोजकांना धन्यवाद दिले. तसेच क्रीडा क्षेत्रात आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या खेळाडूंच्या प्रति आदर व्यक्त केला.
 
          कोट- 
कबड्डी स्पर्धा घ्यावी अशी विनंती संजना कदम यांनी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्याकडे केली होती आणि त्यावर त्यांनी ताबडतोब होकार दिला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमध्ये अनेकदा भव्य दिव्य स्वरूपात भूतो न भविष्यतो असे राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने पुन्हा एकदा स्पर्धा घेण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांचे मनःपूर्वक आभार मानतो. - समिर कदम, युवा नेते भाजप 
 
चौकट- 
या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ २४ एप्रिलला माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते होणार आहे. तर या स्पर्धेतील विजेत्या संघास ०१ लाख रुपये व आमदार चषक, उप विजेत्या संघास ५० हजार रुपये व आमदार चषक तर उपांत्य विजयी दोन्ही संघास प्रत्येकी २५ हजार रुपये व आमदार चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेतील मालिकावीरास दुचाकी मोटार सायकल, उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पकड प्रत्येकी १० हजार रुपये तर पहिला व दुसरा दिवस मानकरीला प्रत्येकी ०५ हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. 
 
 
 
Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

खारघर मंडल भाजपा तर्फे मविआ सरकारच्या विरोधात कंदील आंदोलन