वर्षभरात नवी मुंबई मध्ये ड्रग्ज माफीयांविरुध्द धडक कारवाई  

नवी मुंबई ः नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने २०२३ या वर्षामध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात धडाकेबाज कारवाई करुन अंमली पदार्थाच्या तस्करीत गुंतलेल्या एवूÀण ३५३ आरोपींना अटक केली आहे. तसेच २९० कारवायांमध्ये सुमारे २१.१३ कोटी रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई पोलिसांनी विशेष मोहिमेद्वार ७ महिलांसह ३० परदेशी नागरिकांची धरपकड करुन अंमली पदार्थाच्या तस्करीचे रॅकेट उध्वस्त केले आहे.  

२१व्या शतकातील शहर म्हणून नावारुपाला आलेल्या नवी मुंबई शहराला देखील अंमली पदार्थाचा विळखा पडला आहे. नवी मुंबई परिसरात ड्रग्स माफियांकडून तरुणांना ड्रग्स विक्री करण्यात येत असल्यामुळे तरुण पिढी व्यसनाधिन होत आहे. त्यामुळे नवी मुंबई शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पुढाकार घ्ोतला आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबईत सुरु असलेली अंमली पदार्थांची तस्करी आणि त्यामागे असलेले रॅकेट उध्वस्त करुन त्यांचे धंदे बंद करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांविरोधात धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे.  
त्यानुसार नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने तसेच आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांनी २०२३ या वर्षामध्ये अंमली पदार्थाशी संबंधित एवूÀण २९० गुन्हे दाखल करुन ३५३ आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे यात ७ महिलांसह ३७ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. सदर कारवाईत सुमारे २१.१३ कोटी रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. यात ९.३३ कोटी रुपये किंमतीचे एमडी (मेफेड्रॉन), ५.९६ कोटी किंमतीचे ७.४२९ किलोग्रॅम वजनाचे मेथ्यॅक्युलॉन, ३.६४ कोटी रुपये किंमतीच्या १८२ किलोच्या १०० ग्रॅम वजनाच्या थर्माडोल टॅबलेटस्‌ जप्त करण्यात आले आहेत.  
त्याचप्रमाणे १.२५ कोटी रुपये किंमतीचे कोकेन, २३.८४ लाख रुपये किंमतीचे ५९६ ग्रॅम वजनाचे एम्फेटामाईन, २२.१० लाख रुपये किंमतीच्या २२१ एमडीएमएच्या गोळ्या, १९.८० लाख रुपये किंमतीचे एलएसडी पेपर, १५.४० लाख रुपये किंमतीचा ३.६४५ किलोग्रॅम वजनाचा चरस, ८.४७ लाख रुपये किंमतीचा ५३.६८५ किलोग्रॅम वजनाचा गांजा, २.०८ लाख रुपये किंमतचे कोडाईन सिरप, १.७८ लाख रुपये किंमतीची ब्राऊन शुगर, ३३,१६० रुपये किंमतीचे हेरॉईन, ७६९२ रुपये किंमतीचे नेट्राझेपेम टॅबलेटस्‌च्या १४ स्ट्रीप्स असे एवूÀण २१.१३ कोटी रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत.  
गुटखा, हुक्का पार्लरवर कारवाई...  
नवी मुंबई पोलीस आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने गतवर्षामध्ये गुटखा, पान मसाला आणि सुगंधीत तंबाखुच्या तस्करी प्रकरणात १०६ कारवाया करुन १८२ आरोपींना अटक केली आहे. तसेच १.७० कोटी रुपये किंमतीचा वेगवेगळ्या प्रकारचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. तसेच नवी मुंबई पोलिसांनी हुक्का पार्लरच्या ४१ कारवाया करुन २२६ पुरुष आणि ७ महिला अशा एवूÀण २३३ जणांना अटक केली आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलिसांनी कोपटा कायद्यांतर्गत ३० कारवाया करुन ४३ जणांना अटक केली आहे.    
शाळा-कॉलेज, झोपडपट्टी परिसरात अंमली पदार्थाची खरेदी-विक्री...
२१व्या शतकातील शहर म्हणून नावारुपाला आलेल्या नवी मुंबई शहराला देखील अंमली पदार्थाचा विळखा पडला आहे. नवी मुंबई परिसरात ड्रग्स माफियांकडून तरुणांना ड्रग्स विक्री करण्यात येत असल्यामुळे तरुण पिढी व्यसनाधिन होत आहे. नवी मुंबईतील शाळा-कॉलेज आणि झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची खरेदी-विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील झोपडपट्ट्यांमधून गांजा, चरस गुटखा या सारखे अंमली पदार्थ महिला आणि भिकारी यांच्या माध्यमातुन विकण्याचे प्रकार सुरु असल्याचे दिसून येत आहे.    
अंमली पदार्थांची तस्करीत परदेशी नागरिकांचा सर्वात जास्त सहभाग...
नवी मुंबईत बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेले बहुतेक परदेशी नागरिक अंमली पदार्थांच्या तस्करीत तसेच गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतल्याचे आढळून आले होते. त्यामुळे परदेशी नागरिकांकडून सुरु असलेली अंमली पदार्थांची तस्करी आणि त्यांचे सुरु असलेले अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिले होते. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने नवी मुंबईत बेकायदेशीररित्या वास्तव्यास राहून अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या परदेशी नागरिकांवर २ महिने वॉच ठेऊन सप्टेंबर महिन्यात विशेष मोहिमेद्वारे ६ ठिकाणी धाड टाकत एवूÀण ३७ परदेशी नागरिकांना अटक केली होती. या कारवाईत सुमारे ५ कोटी रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते,

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 बस चालवताना चालकाकडून मोबाईलचा वापर?