१० आंदोलनाची ताकद एका मतदानात आहे, तेव्हा विचार करूनच मतदान करा - बच्चू कडू
दिवाळीपर्यंत शिक्षक भरती न केल्यास तीव्र आंदोलन
नवी मुंबई -:नवी मुंबई महापालिकेची कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळेत सहामाही परीक्षा देखील अंतिम टप्प्यात आली. मात्र परीक्षा संपत आली तरी देखील या शाळेत अजूनही पूर्ण क्षमतेने शिक्षक नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत शिक्षक भरती करा, अन्यथा महापालिका मुख्यालय समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असा येथील पालकांनी शिक्षणाधिकारी आणि आयुक्तांची भेट घेऊन दिला आहे.
दर्जेदार शिक्षण देणारी महापालिका म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेचे नाव आहे. त्यामुळे मराठी माध्यमात पट संख्या वाढत आहे.आणि ही वाढती पटसंख्या पाहता मनपाने दोन सीबीएससी शाळा सुरू केल्या आणि अशा शाळा सुरू करणारी नवी मुंबई महापालिका ही राज्यातील प्रथम महापालिका ठरली आहे. मागील पाच वर्षांपासून नेरुळ आणि कोपरखैरणे येथे ही शाळा सुरू आहे आणि या शाळांना देखील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत असून पटसंख्या वाढत आहे. नेरुळ सीवुड येथील शाळेत विद्यार्थ्यांच्या तुलनेत पुरेसे शिक्षक उपलब्ध आहेत. मात्र कोपरखैरणे येथील शाळा क्रमांक ९४ मध्ये शिक्षका विना विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाताहत सुरू आहे. नियमानुसार ३०-४० पटसंख्या असलेल्या वर्गाला एक शिक्षक असणे गरजेचे आहे. १२५०विद्यार्थ्यांना किमान ३० शिक्षक अनिवार्य आहेत. मात्र सध्या या शाळेत १२५०विद्यार्थ्यांची मदार अवघ्या १० शिक्षकांवर आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षकांवर असल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकासन होत आहे.त्यामुळे पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून दिवाळीपर्यंत शिक्षक भरती झालीच पाहिजे अन्यथा मनपा विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. इशारा पालकांनी दिला आहे. तर येथील दिवाळीपर्यंत रक्षक भरती पूर्ण होईल व विद्यार्थ्यांना आवश्यक शिक्षक उपलब्ध होतील अशी माहिती महापालिका अतिरिक्त शिक्षण अधिकारी योगेश कडूसकर यांनी दिली आहे.