महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
वर्षावासास प्रारंभ
बुद्ध विहार हे विचारांचे प्रबोधन करणारे केंद्र असतात. वर्षावास निमित्ताने बुध्द विहारात वर्षभरात आपण काय केले आणि काय केले नाही ते करण्याचा संकल्प केला जातो. म्हणून त्यांच्यात सतत परिवर्तन होत असते. त्यातूनच समाजात वैचारिक परिवर्तन होत असते. म्हणूनच बुद्ध विहारे ही समाजाची परिवर्तनाची केंद्रे असायला पाहिजेत. वर्षावास निमित्ताने बुध्द विहारे परिवर्तनाची केंद्रे होत आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती व्यवस्थेला कंटाळून हिन्दू धर्माचा त्याग करून तथागत बुद्धाचा धम्म स्वीकारुन जाहिरपणे धम्म दीक्षा घेतली होती. ती घेतांना आपल्या नऊ कोटी समाज बांधवांना २२ प्रतिज्ञा दिल्या होत्या. त्या पूर्णपणे न स्विकारल्यामुळे तथागत बुद्धाचे विचार आज आचरणात आण्यात समाज खुप कमी पडतो .म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकार लिखित "बुध्द आणि त्यांचा धम्म हा महान ग्रंथ खेड्यापाड्यातील बुध्द विहारात वाचला जात आहे. १४ ऑक्टोंबर १९५६ पासून आम्हाला समाजात कोणताही बदल झाला असे म्हणता येत नाही किंवा बदल झालाच नाही असेही म्हणता येत नाही. उत्सव महत्वाचा वाटतो. कारण प्रत्येक धर्माचे सण त्या त्या धर्माच्या माणसांना नवसंजीवनी देतात. उत्स्फुर्तपणे ते सणाचा आनंद घेतात. दरवर्षी त्याचा उत्साह वाढत जातो. तिथे विचारांशी काही घेणे देणे नसते. वडिलोपार्जित परंपरा आणि धर्माचा समाजाचा रीतीरिवाज पाळला जातो. त्यात विचार आणि त्यानुसार आचरण बिलकुल नसते. त्याप्रमाणेचं महापुरुषांची जयंती, भिम जयंती, बुद्ध जयंती होत चालली की काय असा प्रश्न उभा राहतो. बुद्ध विहारे कशासाठी बांधली जातात? मंदिरात पूजा अर्चा कर्मकांड केली जातात. पण बुद्ध विहार हे विचारांचे प्रबोधन करणारे केंद्र असतात. त्यातूनच समाजात वैचारिक परिवर्तन होत असते. म्हणूनच बुद्ध विहारे ही समाजाची परिवर्तनाची केंद्रे असायला पाहिजेत. वर्षावास निमित्ताने बुध्द विहारे परिवर्तनाची केंद्रे होत आहेत.
भगवान बुद्धाचे अतिशय महत्त्वाचे वाक्य... शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय. तोच खरा धम्मोधर असतो. धम्म उपासक उपासिका बनण्याकरीता स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करतो. म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. त्यामुळे आपली सामाजिक आर्थिक प्रगती होईल आणि तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा मिळेल. असा सोप्या भाषेत सांगणारे बुद्ध आम्हाला आजही समजले नाही. बुद्ध पोर्णिमा जगातील मानवाच्या दुष्टीने खूप महत्वपूर्ण सण, उत्सव आहे.तो वेगवेगळ्या देशात वेग वेगळ्या नांवाने ओळखला जातो.त्यांची बुद्ध विहारे ही समाजाची परिवर्तनाची केंद्रे असातात. वर्षभर ते उपासक, उपासिकांनी आणि भिक्खू संघाने गजबजलेली असतात. तिथे लक्षवेधी उपक्रम राबविले जातात. वर्षावास निमित्ताने बुध्द विहारात वर्षभरात आपण काय केले आणि काय केले नाही ते करण्याचा संकल्प केला जातो. म्हणून त्यांच्यात सतत परिवर्तन होत असते कारण त्यांची बुद्ध विहारे परिवर्तनाची केंद्रे असतात.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतमाचा जन्म लुंबिनी शक्य राज्य नेपाल येथे झाला. याच दिवशी सात वर्ष कठोर तपचार्या करून गया बिहार येथे त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. आता ती बुद्ध गया म्हणून ओळखली जाते आणि याच दिवशी वयाच्या ८० वर्षी त्यांचे कुशीनगर उतर प्रदेश येथे महापारीनिर्वाण झाले. तथागत बुद्धांनी सांगितले होते, अतः दिप भव, स्वयं प्रकाशीत व्हा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ”शासन करती जमात व्हा!. या दोन महान संदेशाचा अर्थच आम्ही समजुन घेतला नाही. कारण आम्ही विचाराशी प्रामाणिक नाही. बुद्धाने सांगितलेला धम्म आणि त्यानुसार बनविलेला संघ तो पर्यत आठवत नाही. जोपर्यंत अन्याय, अत्याचार होत नाही. शोषण होत नाही.
धर्मांतरीत आंबेडकारी समाज, संघ, संघटना आणि पक्ष विचारधाराच मानत नाही. हे मान्य करीत नाही. म्हणुन इतराशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं; पण स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता. पण हे समाजाला कोण सांगेल? आंबेडकर आणि बुद्ध जयंती साजरी केलीच पाहिजे; पण विचारधारेनुसार आत्मचिंतन व आत्मपरीक्षण करून पुढच्या दिशा ठरविता आल्या तर त्याला महत्व प्राप्त होते. युद्ध नको बुद्ध हवा म्हणायचे आणि आर एस एस च्या प्रत्येक घटनेकडे लक्ष ठेऊन स्वतःचा कार्यक्रम ठरवायचा. म्हणजे तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार नाही. ते त्यांचा विषमतावादी असमानता निर्माण करणारे विचार मांडत राहतील. तुम्हाला समता, स्वात्रंत्र्य, बंधुभाव निर्माण करणारे विचार सतत मांडत रहावे लागेल. त्यानुसार समाजात चर्चा बैठका घेऊन सातत्य ठेवावे लागेल. केवळ जयंती साजरी करून आपसातील मतभेद दूर होणार नसतील तर एकत्र जयंती साजरी करण्याचा अर्थ काय? यासाठीच बुद्ध विहारे ही समाजाची परिवर्तनाची केंद्रे असायला पाहिजेत आणि वर्षावास निमित्याने बुध्द विहारे परिवर्तनाची केंद होतांना आज तरी दिसत आहेत.
माणसाच्या संघाने, संघटनेेने, पक्षाने जीवनात एकदा ध्येय निध्राारित केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नये, कारण पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात. हे आजच्या आंबेडकरी चळवळीला कोण सांगेल? बुद्ध म्हणतात काहीही करा; पण गुणवत्तापूर्ण करा. ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जिव ओता. त्यात सर्वोचस्थानी आपण पोचु शकतो. स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःविषयीच्या सकारात्मक गोष्टीचे चिंंतन सतत केले पाहिजे. संघर्ष केल्याशिवाय जीवनात काहीच मिळत नाही. त्याचप्रमाणे सातत्याने प्रयन्त केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही. आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला सुरवात केली की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते. म्हणुनच बुद्ध विहारे ही समाजाची समाज परिवर्तनाची केंद्रे असायला पाहिजे होती.पण बहुसंख्य विहारे व्यक्तिगत आणि राजकीय मतभेदामुळे बंद असतात. त्यामुळेच खऱ्या अर्थाने वैचारिक चर्चा होते, पण परिवर्तन होत नाही. व्यक्तिगत आर्थिक परिवर्तन होतांना दिसते; पण सामाजिकदृष्ट्या ते दिसत नाही. ती वर्षावास निमित्ताने बुध्द विहारे परिवर्तनाची केंद्रे झाली पाहिजेत. आणि ती होत आहेत.
श्रीलंका, थायलंड, बर्मासह १८० देशात बुद्ध विहारे ही शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्रांतीचे केंद्र असतात. तिथे शिस्तबद्धता आचरणात सर्व व्यवहार आणली जातात. एक दिवस विशेष बुद्ध जयंती साजरी करून त्यांना काहीच बदल अपेक्षित नसतो. समाजातील चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वतःशीच लढाई असते त्याला कोणीच हरवु शकत नाही. जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं असं काही तुम्हाला हवे आहे, मग आजवर जे काहीच केले नाही असं काही तरी करण्याची तयारी ठेवा. म्हणजे समाजात बदल घडेल. बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वतःच मन बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाही. अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धानी मानव कल्याणासाठी सांगितलेला संदेश आजही एकूण मानव जातीसाठी खुप उपयोगी आहे.व्यक्तीचा विकास झाला तर समाजाचा होईल. जर समाजातील व्यक्तीचा विकास झाला नाही तर समाज काय करेल? व्यक्ति एकत्र आल्या तर समाज तयार होतो. समाज एकत्र आला तर संघ, संघटना आणि पक्ष तयार होतो. मग तो मानव कल्याणाकरीता मानव मुक्तीचा मार्ग खुला करतो.
आज देशात भिख्खु संघ संघटित नाही. त्यामुळेे देशातील उपासक उपासिका यांचाही संघ, संघटना संघटित नाही. डॉ.बाबासाहेबांनी दिलेला धम्म कितीही चांगला असला तरी तो आत्मसात करण्यात आपण कुठेतरी कमी पडतो. म्हणुन तमाम आंबेडकरी चळवळीतील बौद्ध बांधवानी वर्षावासानिमित्ताने स्वतःचे आत्मचिंतन करून आत्मपरीक्षण करून बुद्धाला त्यांच्या धम्माला शरण जावे आणि संघ शक्ति बनवावी. बुद्ध धम्म आणि संघ आचरणात आना. त्यासाठीच वर्षावास निमित्याने बुध्द विहारे परिवर्तनाची केंद्रे झाली पाहिजेत हा दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेऊन कुशल पुण्य कार्य करा, हिच सर्वाना नम्र विनंती, आणि वर्षावासा निमित्ताने सर्वांना हार्दिक मंगल कामना!!!.सबका मंगल हो !!!.- - सागर रामभाऊ तायडे