नवी मुंबई शहरात अनधिकृत बांधकामाचा धुमाकुळ सुरूच

नवी मुंबई : शहरात अनधिकृत बांधकामाचा धुमाकुळ सुरू आहे. यावर काही बांधकामावर पालिकेकडून नेहमीच कारवाईची मात्रा उगारली. तर काहीवर काहीही कारवाई झाली नाही. परंतु ज्या निम्म्या बांधकामावर कारवाईचा बडगा उगारला खरा पण, ती बांधकामे आज इमारतीत रूपांतर झाली आहेत. तर जी अवैध बांधकामे निष्कासित केली नाहीत. त्यादोन्हीही ठिकाणी गुण्यागोविंदाने लाखो कुटुंब वास्तव्यास गेली आहेत. या संदर्भातील अवैध बांधकामांचा पालिकेचा अहवाल हाती सापडला आहे. दरम्यान आजही निष्कासित केलेली नवीन अवैध बांधकामे पुन्हा जोरात चालू असल्याचे समोर आले आहे.

पालिकेने जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ मध्ये आठही विभाग कार्यालय परिसरातील सुरू आसलेल्या विविध प्रकारच्या अनधिकृत बांधकामांचा अहवालात ३२९ बांधकामे असल्याचे म्हटले आहे. तर १८२ अनधिकृत बांधकामावर निष्कासित करण्याची कारवाई पालिकेने केली असल्याचे म्हटले आहे. तर ही बांधकामे गावठाण, गावठाण विस्तार, सिडको भूखंडावर असलेली बांधकामे व नोड भागातील बैठ्या चालीवर अवैध बांधकामे सुरू होती.तसेच आर्थिक दुर्बल घटकांसाठी बांधण्यात आलेल्या चालीवर देखील अवैध बांधकामे झाली आहेत.तसेच किती बांधकामावर कारवाई झाली नाही. याचीही माहिती पालिकेने अहवालात स्पष्टपणे दिली आहे.परंतु आजच्याघडीला कारवाई झालेली बांधकामे व कारवाईचा हत्यार न उगारलेली बांधकामे मागील नऊ महिन्याच्या कालावधीत पूर्णत्वास गेली आहेत.

१४० भूमाफिया भाग्यवान..

ज्या १४० बांधकामावर  हातोडा पडला नाही. ते सहिसलामत सुटले. त्यांनी कोट्यवधी रुपये कमवले. परंतु ज्या १८२ भूमाफियाच्या बांधकामावर  कारवाई झाली त्यांना मात्र चारही बाजूने नुकसान सहन करावा लागला. तर ज्या ७ भुमाफियांच्या बांधकामावर दुबार कारवाई झाली. त्यांना मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले. परंतु अवैध बांधकामात अमाप पैसा प्राप्ती होते.त्यामुळे त्यांना याचे काहीही वाटत नसल्याचे पालिका सूत्र सांगतात.

चौकट

आजही पालिकेकडून विविध अवैध बांधकामावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे.पण ही कारवाई होण्याच्या काही तासातच पुन्हा त्याच ठिकाणी ती बांधकामे पुन्हा सुरू होत आहेत. पुन्हा त्यावर कारवाई केली जात नाही. यामुळे कारवाई केलीच कश्याला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जात आहे .

चौकट

पुन्हा बांधकाम सुरू...

२५ जुलै रोजी समर्थ नगरच्या प्रवेशद्वारावर असलेल्या एका चार माळ्याच्या इमारतीला पालिका व सिडको कडून जमीनदोस्त केली होती.त्यावेळी प्रशासनाचे कौतुक देखील केले गेले होते. परंतु हेच बांधकाम आता पुन्हा सुरू झाले आहे. हाच प्रकार वाशी, जुहू गाव,सेक्टर ११ येथील खाडी किनारा वर असलेल्या मारुती मंदिराच्या समोर असलेली इमारत देखील तोडली होती .ती देखील आता बिनधास्तपणे नव्याने उभी राहत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ग्राहक विद्युत पुरवठा तक्रारी टोल फ्री क्रमांकावर नोंदवा