मुंबई-ट्रान्स हार्बर लिंक कामाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

प्रकल्पाचे ८४ टक्के काम पूर्ण; डिसेंबर २०२३ पूर्वी प्रकल्प पूर्ण करावा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी मुंबई ः मुंबई-ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम ८४ टक्के पूर्ण झाले आहे. पुढील वर्षी डिसेंबरपूर्वी सदर प्रकल्प पूर्ण होईल. त्यामाध्यमातून रायगड जिल्ह्यातील चिर्ले जवळील पेण, पोयनाड परिसरात ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. लॉजिस्टिक्स पार्क, टाऊनशिप आणि रोजगार निर्मिती या तीन बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार असून त्यातून याभागाचा सूनियोजितपणे विकास होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

शिवडी येथून सुरु झालेल्या मुंबई-ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४ सप्टेंबर रोजी केली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष सागरी सेतुवर जावून कामाचा आढावा घेतला. यावेळी ‘एमएमआरडीए'चे महानगर आयुक्त श्रीनिवास यांनी कामाबाबत माहिती दिली.

दिवसाला एक लाख वाहनांची ये-जा करण्याची क्षमता...

मुंबईला रायगड जिल्ह्याशी थेट जोडणारा सदर २२ कि.मी. लांबीचा देशातील सर्वाधिक मोठा पहिला सागरी सेतूमार्ग आहे. या सागरी सेतूवरुन दिवसाला किमान एक लाख वाहनांची ये-जा करण्याची क्षमता असून नागरिकांच्या वेळेची तसेच इंधनाची मोठी बचत होईल. प्रदुषण विरहित असा सदर प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्याचे काम करताना पर्यावरणासोबतच पलेमिंगोंची देखील काळजी घ्ण्यात आली असून गेल्या वर्षी पेक्षा यंदा जास्त पलेमिंगो आल्याचे त्यांनी सांगितले. सदर सागरी सेतूमुळे मुंबई ते रायगड जिल्ह्यातील चिर्ले अंतर केवळ १५ ते २० मिनिटात पार करणे शक्य होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.


एमटीएचएल प्रकल्प ‘ईस्टर्न फ्री-वे'ला जोडणार...

राज्याच्या सकल उत्पन्नात सव्रााधिक वाटा मुंबई महानगर क्षेत्रातून येत असून या भागातील नागरिकांना हा  प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,  मुंबई ट्रान्स हार्बर लिंक चिर्ले गावाजवळून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला जोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर हा प्रकल्प ईस्टर्न फ्री वे ला जोडणार असल्याने थेट रायगडच्या दिशेने प्रवास करणे शक्य होणार आहे. शिवाय मुंबई - वरळी कोस्टल रोड देखील शिवडी वरळी कनेक्टरमार्गे हा प्रकल्प जोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

ओएसडी जपानी तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर...

सदर प्रकल्पाचे काम करताना ऑर्थोटॉपीक स्टील डेस्क (ओएसडी) या जपानी तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर करण्यात आला आहे. त्याचे वजन काँक्रीटपेक्षा कमी असून वेगाने काम होण्यास मदत होत आहे. पर्यावरणपुरक असा सदर प्रकल्प असून त्याच्या माध्यमातून वर्षाला सुमारे २६ हजार टन कार्बन डायऑक्साईड कमी होणार आहे. ३ पॅकेजच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम सुरु असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी शिवडी प्रकल्प कार्यालयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. महानगर आयुवत श्रीनिवास यांनी प्रकल्पाबाबत सादरीकरण केले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विकास आराखड्यात प्रस्तावित रस्त्यांमध्ये अनेक घरे बाधीत