संततधार पर्जन्यवृष्टीने मोरबे धऱणाच्या पातळीत वाढ
पाण्याचे महत्व लक्षात घेऊन नवी मुंबईकर नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नवी मुंबई : स्वत: च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पामुळे जलसमृध्द शहर अशी नवी मुंबईची ओळख आहे. यावर्षी खूप उशीरा पावसाळी कालावधी सुरु झाल्याने काही शहरांनी पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. मात्र, नवी मुंबई महापालिकेने असा निर्णय न घेता नागरिकांना दिलासा दिला होता. त्याच वेळी इतर शहरातील पाणी टंचाई लक्षात घेता पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहनही महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले होते.
|