१० वी, ११ वी, १२ वी, पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी केंद्र सरकार नोकरीची सुवर्णसंधी, मार्गदर्शन शिबीर
स्टाफ सिलेक्शन कमीशन परीक्षा जुलै २०२२ रोजी होणार असून त्यात १० वी, ११ वी, १२ वी, पदवीधर तरुणांना विविध पदांसाठी अर्ज करण्याची मुदत ३० एप्रिल २०२२ आहे. वयोमर्यादा २५-२७ वर्षापर्यंत असून या परिक्षेची माहिती, तयारीसाठी आगरी समाज मंडळ ठाणे परिसर या संस्थेने मोफत मार्गदर्शन शिबीर दि. १७ एप्रिल, २०२२ रोजी संध्या. ४ ते ७ या वेळेत, सहयोग मंदिर, पहिला मजला, घंटाळी, ठाणे (प.) - ४००६०२.येथे आयोजित केले असून या शिबिरात निवृत्त सहाय्यक आयुक्त, केंद्रीय उत्पादन शुल्क, लोकसत्तामधील ‘नोकरीची संधी’ स्तंभलेखक सुहास सिताराम पाटील मार्गदर्शन करणार असून या संधीचा २५-२७ वर्षाखालील उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे मंडळाचे अध्यक्ष्य निवृत्त प्रा. सी. जी. पाटील यांनी केले आहे.
संपर्क ९८२००४५१६५,९८१९७०३८८८