नारळी पौर्णिमेचे औचित्य साधत होड्यांवर फडकवला तिरंगा
नवी मुंबई -: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘हर घर तिरंगा’ हे अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.आणि त्याची जनजागृती नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात होत आहे .गुरुवारी नारळी पौर्णिमेचेऔचित्य साधून वाशी खाडीत नवी मुंबईतील मरीआई मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष हरीश सुतार यांच्या संकल्पनेतून वाशी गावातील मच्छीमारांनी एकत्र येत आपल्या होड्यांवर तिरंगा फडवत अनोखी सलामी दिली.