व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यानी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृह प्रवेशप्रकिया सुरु ; 30 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन 

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून मुंबई विभागातील 7 जिह्यातील 41 शासकीय वसतिगृहासाठी सदरची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षा करिता शालेय विद्यार्थ्यानी 15 जुलै 2022 पर्यंत तर व्यासायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यानी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाकडुन करण्यात आले आहे. 

मुंबई विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्हातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील  शालेय विद्यार्थी, इयत्ता 10 वी व 11 वी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील इतर शैक्षणिक / व्यवसायीक अभ्यासक्रमातील प्रथम व व्दितीय वर्षांच्या प्रवेशीत विद्यार्थ्याना  समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेता येणार आहे. त्याचप्रमाणे, तालुका स्तरावर मुला /मुलींचे शासकीय वसतिगृहासाठी इयत्ता 8 वी पासुन ते पुढील अभ्यासक्रमांकरिता प्रवेश अर्ज वाटपाबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे.  

शालेय विद्यार्थीसाठी 15 जुलै, इयत्ता 10 व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीसाठी 30 जुलै, बी.ए./बी.कॉम/ बी.एस.सी अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवीका / पदवी आणि एम.ए / एम.कॉम. / एम.एस.सी असे पदवीनंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदवीका (व्यावसयिक अभ्यासक्रम वगळुन) इत्यादी अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची मुदत ही 24 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे. तर व्यासायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यर्थ्याना 30 सफ्टेबर 2022 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून नाश्ता, भोजन, निवासाची सोय, शैक्षणिक साहित्य तसेच निर्वाह भत्ता देण्यात येतो. 

विद्यार्थ्यांना ज्या वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल तेथुन अर्ज प्राफ्त करुन नमुद दिनांकापर्यत आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी आपले अर्ज विहीत वेळेत परिपूर्ण माहितीसह सबंधित वसतिगृहातच सादर करावेत असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या मुंबई प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांनी केले आहे. अधिक माहिती साठी संबंधित शासकीय वसतिगृह तसेच सबधित जिह्याचे सहायक आयुक्त कार्यालयात संपर्क साधण्याबाबत देखील कोचुरे यांनी सुचित केले आहे.   

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका प्रशासनाकडून डायलेसिस केंद्रामधील आवश्यक तरतुदींची पूर्तता