भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर
भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महापालिकेचा सन २०२४-२५ चे सुधारित १००२,२३.८० लक्ष रुपये आणि सन २०२५-२६ चे १०९७,४९.७९ लक्ष रक्कमेचे आणि ९.६९ लक्ष रुपये शिल्लक दर्शविणारा अर्थसंकल्प मुख्य लेखा-वित्त अधिकारी रामप्रसाद सोळुंके यांनी आयुक्त अनमोल सागर यांना २४ मार्च रोजी सादर केला.
दरम्यान, शहराच्या विकास कामांकरिता निधीची आवश्यता आणि महापालिकेचे उत्पन्न याचा ताळमेळ घेऊन चांगल्या प्रकारे अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये मुख्य ५-६ विषयांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, असे आयुवत अनमोल सागर यांनी सांगितले.
अर्थसंकल्पातील ठळक मुद्द्याअंतर्गत सर्वप्रथम १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने यासाठी येणाऱ्या वर्षाकरिता प्रशासकीय तरतुदीसह सीएसआर फंडातून काही निधी उभारण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. शहर सौंदर्याकरण आणि सुशोभिकरणसाठी भिवंडी शहरामध्ये मोठा वाव आहे. शहर स्वच्छता अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठी वेगळी तरतूद करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आवश्यकतेप्रमाणे तरतूद करुन सर्वांच्या सहकार्याने सुशोभिकरणासाठी मोहिम राबविण्यात येणार असून त्याकरिता टास्क फोर्स तयार करण्यात आले आहे. कर वसूलीसाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहे, जे महापालिकेचे उत्पन्नाचे महत्त्वाचे स्त्रोत आहे. संपूर्ण प्रशासनाकडून सहकार्य करुन जास्तीत जास्त वसूलीकरिता प्रयत्न केले जाणार आहेत, असे आयुवत सागर म्हणाले.
बीजीपी दवाखान्यामध्ये ओ.पी.डी. सुरु झाली असून त्याठिकाणी सुसज्ज रुग्णालय सुरु करायचे आहे. याद्वारे नागरिकांना आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याचा मुख्य उद्देश आहे. शहरामध्ये पाणीपुरवठा समप्रमाणात आणि याग्यप्रकारे होण्यासाठी १०० द.ल.लि. योजना सुरु होणार आहे. योजना यशस्वी झाल्यानतर भिवंडी शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघेल. भुयारी गटार योजना आणि पाणी पुरवठ्याच्या इतर योजनांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण विभागाकरिता डिजीटल क्लासरुम शासनाच्या सहकार्याने उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये प्रगती करण्यासाठी तरतूद ठेवलेली आहे. कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने ई.एच.आर.एम.एस. तसेच प्रशासनाच्या कामकाजाच्या दृष्टीकोनातून सुव्यवस्थापन आणि पारदर्शकता येण्याकरिता ई-ऑफिस आज्ञाप्रणाली विकसित करण्यात येणार आहे. शहरातील उद्याने आणि स्मशानभूमी यांचे पर्यावरण पूरक संवर्धन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पदपाथांचे सुव्यवस्थापन आणि सुशोभिकरण करण्यासह वाहतूक व्यवस्था सुनियंत्रित करुन शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुवत सागर यांनी दिली.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त (१) देविदास पवार, अतिरिवत आयुक्त (२) वि्ल डाके, मुख्य लेखा-वित्त अधिकारी रामप्रसाद सोळुंके, उपायुक्त (मुख्यालय) रोहीदास दोरकुळकर, उपायुक्त (समाज कल्याण) प्रणाली घोंगे, उपायुक्त (शिक्षण) अनुराधा बाबर, उपायुक्त विक्रम दराडे, अंतर्गत लेखा परीक्षक नंदकुमार चौधरी तसेच महापालिकेचे सर्व सहायक आयुक्त आणि विभागप्रमुख उपस्थित होते.
अर्थसंकल्पामध्ये जी तरतूद करण्यात आली आहे त्याचा पूर्णपणे आवश्यकतेनुसार योग्यप्रकारे वापर करणे. अर्थसंकल्पामध्ये पुनर्विनियोजन करण्याची आवश्यकता पडू नये. यासाठी सर्व विभागांनी कामाची आवश्यकता लक्षात घेऊन बिलांसाठी मार्च महिन्याची वाट न बघता वेळापत्रकानुसार खर्च करुन वेळच्या वेळी कामाची देयके सादर करावीत. अर्थसंकल्प सादर करण्यापेक्षा त्याची तरतुदीनुसार आणि योग्यप्रकारे अंमलबजावणी करणे फार महत्त्वाचे आहे. कामाची आवश्यकता आणि निकड भासल्यास पुनर्विनियोजन करण्यास प्राधान्य देण्यात येईल. सर्वांनी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार आणि योग्यप्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करावे.
-अनमोल सागर, आयुक्त- भिवंडी महापालिका.